दिनांक १४ फेब्रुवारी २०१९ रोजी ,आपल्या भारतावर भ्याड दहशतवादी हल्ला करण्यात आला होता . हा भ्याड हल्ला दुसरा ,तिसरा कोणी केला नसून हैवान पाकिस्तान कडून करण्यात आलेला . जम्मू आणि काश्मीर मधील पुलवामा जिल्ह्यात हा हल्ला करण्यात आला होता.जम्मू आणि काश्मीर मधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात आपले ४२ शूर जवान शहीद झाले . दहशतवाद्यांच्या या भ्याड हल्ल्या नंतर सोशल मीडियावरून ,लोकांनी आपला संताप व्यक्त केला. या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली असून आपल्या शहीद वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात अली.
सकाळपासून सर्वत्र व्हेलेंटाईन डे चा उत्साह साजरा होत होता तेवढ्यातच अंगावर शहारे आणणारी घटना घडली . आपल्या देशावर दहशतवादी हल्ला झाल्याची बातमी कानावर पडली आणि त्या हल्ल्या मध्ये आपले ४२ जवान शहीद झाल्याची दुःखद बातमी समजली . दहशतवादी हल्ल्याची बातमी कळताच सर्व भारतीयांची तळपायाची आग मस्तकात गेली . परंतु एकीकडे सर्वांना दहशतवाद्यांचा खूप राग येत होता तर दुसरीकडे आपले जवान शहीद झाले याच दुःख अनावर झालं होत, संपूर्ण देश शोकाकुळ झाला होता. आता फक्त आणि फक्त आपल्या जवानांच्या प्राणांचा बदला,पाकिस्तानचा सुपडा साफ आणि एकही आतंकवादी जिवंत राहता काम नये एवढंच आपल लक्ष्य.
सकाळपासून सर्वत्र व्हेलेंटाईन डे चा उत्साह साजरा होत होता तेवढ्यातच अंगावर शहारे आणणारी घटना घडली . आपल्या देशावर दहशतवादी हल्ला झाल्याची बातमी कानावर पडली आणि त्या हल्ल्या मध्ये आपले ४२ जवान शहीद झाल्याची दुःखद बातमी समजली . दहशतवादी हल्ल्याची बातमी कळताच सर्व भारतीयांची तळपायाची आग मस्तकात गेली . परंतु एकीकडे सर्वांना दहशतवाद्यांचा खूप राग येत होता तर दुसरीकडे आपले जवान शहीद झाले याच दुःख अनावर झालं होत, संपूर्ण देश शोकाकुळ झाला होता. आता फक्त आणि फक्त आपल्या जवानांच्या प्राणांचा बदला,पाकिस्तानचा सुपडा साफ आणि एकही आतंकवादी जिवंत राहता काम नये एवढंच आपल लक्ष्य.